Very useful information.
मधुकर भावे
आॕगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दुसऱ्या महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई पिंपरी- चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा १ विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही. कंबर दुखू लागली, पायापर्यंत चमक मारु लागली. मंगलाच्या आजारपणामुळे माझं दुखण महत्वाच नव्हतं, त्यामुळे ते अंगावर काढल. त्यानंतर चालणं असह्य झालं.
म्हणून प्रथम डॉ.सुबोध मेहता मग डॉक्टर कपिल अशा नामवंत वैद्यक शास्त्र्यांकडून तपासणी झाली, MRI झाला, इंजेक्शन झाली, गोळ्या सुरु झाल्या. चालता येईना, दुखणं थांबेना. वेदना असह्य झाल्यावर दुखणं बर होत नाही असं जाणवल्यावर निराशा येत गेली त्यातच मंगलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, निराशेत आणखी भर पडली. काय उपचार करावे सुचत नव्हते, डॉक्टरांनी मणक्याचे आॕपरेशन सुचवले, पण ते करणे धोक्याचे आहे, असे त्यांनीच मत दिले. आता काय करायचे ? काही प्रश्नांची उत्तर नियती देत असते.
एक दिवस अचानक माझे दोन मित्र श्री.किशोर अग्रहाळकर (नवी मुंबईचे माजी नगररचनाकार) आणि श्री.अशोक मुन्शी माझ्याकडे आले. माझं दुखणं पाहून त्यांनी सुचवलं की, ‘जोधपुरला चला’ असं सांगायलाच आलो आहोत. दोन्ही जिव्हाळ्याचे मित्र. जोधपूरला उपाय काय माहित नाही, त्यांच्यावर विश्वास ठेऊन जोधपूरला जायचं ठरले. त्यांनी सांगितले की, डॉ. गोवर्धनलाल पाराशर हे विख्यात डॉक्टर दोन अंगठयांनी कंबर, मणका, मान, पाय याठिकाणी ज्या मांसपेशीमध्ये शीर दबलेली असते तिला बरोबर मार्गी लावतात आणि अवघी १० मिनीटांची त्यांची जादू करुन तर बघा...४ डॉक्टर झाले होते, ४ प्रयोग झाले होते. ५ प्रयोग करुया असं समजून जोधपूरला निघालो, सोबत माझी सुविद्य कन्या डॉ.मृदूला (एम.एस.एफ